रविवार, १८ मार्च, २०१८

गुढीपाडव्याचे कालगणनेतील महत्व



कालगणनेसाठी माणूस प्राचीनकाळापासून चंद्रसूर्यावर अवलंबून राहिला आहे. या दोन ग्रहांच्या बाबतीत होणाऱ्या ठळक आणि नियमित घटनांचा वापर आपण कालगणना करण्यासाठी वापरतो. दिवस मोजण्यासाठी सूर्योदय-सूर्यास्तांचा वापर होतो. महिने मोजण्यासाठी पौर्णिमा आणि अमावास्यांचा वापर होतो, सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनाचा वापर वर्षे मोजण्यासाठी करतो. परंतु यांचा एकमेकांत ताळमेळ घालताना थोडी तडजोड करावी लागते, दिन, मास आणि वर्षे हे काळ एकमेकांचे चपखल गुणाकारात बसत नाहीत. दोन पौर्णिमांमध्ये किंवा दोन अमावास्यांमध्ये किती सूर्योदय आणि सूर्यास्त बसतात याचे उत्तर पूर्णांकात येत नाही, तसेच सूर्याच्या दोन उत्तरायणांत किती पौर्णिमा किंवा अमावास्या होतात हे ही पूर्णांकातले उत्तर नव्हे.

दिवसरात्र आणि चांद्रमास यांचा मेळ घालण्यासाठी आपण तिथींचा वापर करतो. चंद्र-सूर्यामधील अंशात्मक अंतराला बाराने भागले असता एक तिथी होते, अशा तीस तिथी दोन पौर्णिमांमध्ये असतात. साधारणपणे दर सूर्योदयाला तिथी बदलत असल्याने, एका तिथीचा काळ हा एका सौरदिनाइतका असतो. काहीवेळा एखादी तिथी दोन सूर्योदय व्यापून टाकते, तिला वृद्धितिथी म्हणतात. काहीवेळा एखादी तिथी एका सूर्योदयानंतर सुरू होऊन त्यालगतच्या सूर्योदयाआधीच संपते, तिला क्षयतिथी म्हणतात. हे अपवाद सोडले तर तिथींचा वापर करून आपण चांद्रमास आणि सौरदिन यांचा ताळमेळ घालतो. तिथी ओळखण्यासाठी सरळसरळ अंकांचा वापर करतात. अमावास्या किंवा पौर्णिमेनंतरची पहिली तिथी प्रतिपदा किंवा प्रथमा, नंतरची द्वितीया, नंतर क्रमाने तृतीया, चतुर्थी वगैरे तिथी येतात.

चांद्रमास आणि सौरवर्ष यांचा ताळमेळ आपण सौरमासांचा वापर करून घालतो. चांद्रमासांची नावे मात्र अंकांचा वापर करून केलेली नाहीत. त्यासाठी आपण नक्षत्रांचा वापर करतो. २७ नक्षत्रांपैकी चित्रा (चैत्र), विशाखा (वैशाख), ज्येष्ठा (ज्येष्ठ), पूर्वा/उत्तराषाढा (आषाढ), श्रवण (श्रावण), पूर्वा/उत्तराभाद्रपदा (भाद्रपद), अश्विनी (अश्विन), कृत्तिका (कार्तिक), मृगशीर्ष (मार्गशीर्ष), पुष्य (पौष), मघा (माघ) आणि पूर्वा/उत्तराफाल्गुनी (फाल्गुन) या नक्षत्रांचा वापर महिन्यांच्या नावासाठी करतात (कंसात महिन्यांची नावेही लिहिली आहेत.). पौर्णिमेच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्राजवळ असेल त्या नक्षत्राच्या नावाने, त्या पौर्णिमेच्या लगतच्या दोन अमावास्यांमधील मास ओळखला जातो. उदा. ज्या पौर्णिमेच्या वेळी चंद्र जेव्हा चित्रा नक्षत्राजवळ असतो, त्या पौर्णिमेच्या लगतच्या अमावास्यांमधील काळ चैत्र महिन्याचा असतो. साधारणपणे असे बारा चांद्रमास उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून होणाऱ्या एका सौरवर्षात साधारणपणे बारा चांद्रमास असतात, आणि या काळात सूर्याची सर्व बारा राशींमधून एक चक्कर पूर्ण होते. म्हणजेच साधारणपणे एका चांद्रमासाचा काळ हा सूर्याला एका राशीतील भ्रमणाइतका असतो. सूर्याच्या एखाद्या राशीतील भ्रमणाला संक्रांत असे म्हणतात. अशा बारा संक्रांती एका सौरवर्षात होतात. साधारणपणे एका चांद्रमासात एक संक्रांत येते. काहीवेळा एका चांद्रमासात दोन संक्रांती येतात, त्याला क्षयमास म्हणतात. काहीवेळा पूर्ण चांद्रमासात एकही संक्रांत येत नाही, त्याला अधिकमास म्हणतात.

महिना कधी सुरु व्हावा यात फारसे वाद आढळत नाहीत. अमावास्येनंतर चंद्र पुन्हा दिसायला लागतो, हा चांद्रमास सुरू होण्यासाठी उत्तम संकेत असल्याने बहुतेक कालनिर्णयांच्या पद्धतीत अमावास्येनंतरच्या दुसऱ्या दिवशी चांद्रमास सुरु होतो. काही कालगणनांमध्ये पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेलाही चांद्रमास सुरु करतात. चांद्रमास सुरु होण्याच्या या दोनच पद्धती प्रचलित आहेत. परंतु वर्ष कधी सुरु करावे यात मात्र फार मतभेद आहेत. सूर्याच्या भ्रमणात वसंतसंपात (vernal equinox) म्हणजे उत्तरायणातील दिवसरात्रीमान एकसारखे असण्याची वेळ, उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते ती वेळ (summer solstice), शरदसंपात (autumnal equinox) म्हणजे दक्षिणायनातील दिवसरात्रीमान एकसारखे असण्याची वेळ आणि दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होण्याची वेळ (winder solstice) हे महत्त्वाचे बिंदू आहेत. ते क्रमश: सायन मेष, कर्क, तूळ आणि मकर संक्रांतींशी संबंधित आहेत. साधारणपणे यातील एका बिंदूपासून सौरवर्षाची सुरुवात करण्याचा प्रघात आहे. भारतात किंवा उत्तरध्रुवावरील बहुतेक ठिकाणी वसंतसंपाताच्यावेळी पानगळ संपून नवी पालवी यायला सुरुवात होते. अमावास्येनंतरच्या प्रतिपदेला जसा चंद्र दिसायला सुरुवात होते हे शुभ मानले जाते, तसेच वसंतागम निसर्गातील या बदलामुळे शुभ मानला जातो. या कारणाने बहुतेक ठिकाणी सौर वर्षाची सुरुवात वसंतसंपातापासून मानतात.

मात्र वसंतसंपाताच्या वेळी अमावास्या होऊन नवा चांद्रमास सुरु होईलच असे नक्की नसते. वसंतसंपाताच्यावेळी चालू असलेल्या चांद्रमासातील कुठलीही तिथी तेव्हा चालू असू शकते. त्यामुळे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष हे एकावेळी सुरु होत नाही. परंतु दिवसरात्रींचे चक्र आणि चांद्रमास यांचा मेळ जसा पौर्णिमा-अमावास्येचा वापर करून करतात, तासाच चांद्रमास आणि सौरवर्ष यांचाही मेळ पौर्णिमा/अमावास्येचा वापर करूनच करतात. अमावास्या पौर्णिमा या फारच ठळक घटना आहेत, त्यांचा अगदी सामान्य जनांनासुद्धा बोध होतो. परंतु वसंतसंपात, शरदसंपात, दक्षिणायन अथवा उत्तरायणाची समाप्ती या त्या मानाने सूक्ष्म घटना आहेत. त्यांचा सामान्य जनांना बोध होईलच असे नाही. त्यामुळे या विशिष्ट बिंदूच्या जवळच्या पौर्णिमा अमावास्येचा उपयोग नव्या वर्षाची सुरुवात करण्यास करतात. वसंतसंपाताच्या वेळी जो चांद्रमास चालू होतो तो चांद्रवर्षाचा पहिला मास समजतात. सध्या वसंतसंपताच्या सुमारास चैत्र हा चांद्रमास सुरु होतो, त्यामुळे चैत्राच्या शुक्लप्रतिपदेला नवे संवत्सर सुरु होते. हाच गुढीपाडवा होय.  नव्या चांद्रवर्षाची किंवा संवत्सराची सुरुवात करण्यासाठी गुढीपाडव्याचा सण  चैत्र शुद्ध प्रतिपदेस साजरा करतात.

गुढीपाडव्याचे महत्व इथेच संपत नाही. पृथ्वीच्या कललेल्या अक्षाच्या अयनामुळे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यातील हा मेळ फार टिकत नाही. या अयनामुळे वसंतसंपाताच्या वेळी सूर्याची पृथ्वीवरून दिसणारी स्थती दरवर्षी सूक्ष्मपणे बदलत असते. याला संपातचलन किंवा अयनचलन (precession of equinox) असे म्हणतात. यामुळे सध्या जरी वसंतसंपाताच्या आसपासच्या पौर्णिमेचा चंद्र चित्रा नक्षत्राजवळ दिसत असला म्हणजेच वसंतसंपाताच्या आसपास चैत्रमास चालू होत असला तरीही आणखी काहीशे वर्षांनी तसे होणार नाही. कधीतरी वसंतसंपाताच्या आसपास फाल्गुनमास चालू होईल, नंतर माघमास असेल. तेव्हा चांद्रमास आणि सौरमास यांचा मेळ घालण्यासाठी चांद्रवर्षाच्या सुरुवातीचा चांद्रमास बदलेल. आज जसे चांद्रवर्ष चैत्रमासाने सुरु होते, तसे ते भविष्यात फाल्गुन किंवा माघाने सुरु होईल. तेव्हा चैत्र शुद्ध प्रतिपदा ही चांद्रवर्षाची सुरुवात न राहता, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा किंवा माघ शुद्ध प्रतिपदा ही चांद्रवर्षाची सुरुवात होईल. सामान्य जनांना हे सूक्ष्म गणित कळणे अवघड आहे, पण कालगणनेसाठी हा मेळ आवश्यक आहे. जर चांद्रवर्षाची सुरुवात सणाने केली तर सामान्य जनांना नवे चांद्रवर्ष सुरु कधी झाले हे कळणे सोपे जाईल. याचा विचार करून पूर्वीच्या शास्त्रकारांनी गुढीपाडवा या सणाची योजना करून ठेवली आहे. वेळोवेळी वसंतसंपाताचे चलन पाहून त्यानुसार गुढीपाडव्याचा मुहूर्त बदलून चांद्र आणि सौरवर्षाचा मेळ घालणे सोयीचे ठरेल.

आज महाराष्ट्रात गुढीपाडवा या सणाबद्दल बरेच उलटसुलट विचार चालू आहेत. त्यात एक मुद्दा असा पुढे केला जातो की चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी सणाची तिथी असल्याचे उल्लेख फार पूर्वीच्या ग्रंथांत (उदा. महाभारत, रामायण) दिसत नाहीत वगैरे, त्यामुळे ही तिथी म्हणजे गुढीपाडवा नाही. हे निरीक्षण जरी बरोबर असले तरीही निष्कर्ष चुकीचा आहे. वर स्पष्ट केल्याप्रमाणे वसंतसंपात सतत बदलत असल्याने, महाभारत आणि रामायण काळी तो चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच येत असेल असे नाही, परंतु त्यावेळीही वसंतसंपाताच्या जवळपासच्या चांद्रमासाच्या सुरुवातीला नववर्षाची सुरुवात साजरी करण्याचा प्रघात होता. त्यामुळे तत्कालीन गुढीपाडवा चैत्रापेक्षा इतर कुठल्यातरी महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला होत असला पाहिजे. सांप्रतकाळी वरील स्पष्टीकरणाप्रमाणे तो चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच होणे योग्य आहे.

शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

संततिसाठी नियोजन




"भाग्यसंकेत" या ज्योतिष विषयाला वाहिलेल्या नामांकित मराठी नियतकालिकाच्या २०१५ सालच्या दिवाळी अंकात माझा "संततिसाठी नियोजन" या नावाने एक लेख प्रसिद्ध झाला होता. सध्याच्या काळात विवाहानंतर जोडप्याला एकमेकांसाठी वेळ देणं, त्यांच्या व्यसाय किंवा नोकऱ्या, त्यानिमित्ताने देश, शहरं बदलणं किंवा आर्थिक सुबत्ता आणि मुलं सांभाळण्याची परिस्थिती येईपर्यंत वाट पाहणं यात विवाहानंतर बराच काळ निघून जातो. योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर संततिसाठी प्रयत्न सुरु होतात. पण हवी असून संतति होतेच असे नाही किंवा संतति होण्यास बरीच वाट पहावी लागते. अनेक पत्रिकांच्या अभ्यासातून केलेल्या निरीक्षणांतून यामागील कारणे आणि उपाय यांचा उहापोह या लेखात केला आहे. ज्योतिषाच्या मदतीने संततिसाठी नियोजन करण्याचा विचार मी या लेखात मांडला आहे. या लेखाच्या शेवटी, विवाहासाठी वधुवरांची पत्रिका पाहतानाच ज्योतिषाशी संततिसाठी नियोजनाबाबत चर्चा करण्याचा वेगळा विचार मी मांडला आहे. 

सामान्यपणे जातकाच्या पत्रिकेत संततिसाठी अनुकूल काळ पुरेसा असतो, कुठलेही ज्योतिष न पाहता अनुकूल काळात संततिचे नियोजन विनासायास होते आणि संततिही होते. परंतु काही पत्रिकांमध्ये हा काळ विवाहानंतर योग्य वयात कमी असतो, किंवा प्रतिकूल काळ जास्त असतो. अशावेळी मात्र पत्रिका पाहून वेळच्या वेळी नियोजन केल्यास संततिबाबत निराश होणे पदरी येत नाही. हा लेख वाचून एक साखरपुडा झालेले जोडपे माझ्याकडे आले आणि त्यांनी संततिनियोजनाबाबत प्रश्न विचारले. त्यांतील वधूच्या पत्रिकेत संततिला अनुकूल काळ खूप कमी असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी संततिचा निर्णय लांबविला तर त्यांना उशीरा संतति होईल किंवा न होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यांचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये होणार होता आणि सुदैवाने विवाहानंतर २०१७ च्या दिवाळीच्या सुमारास संतति होण्याचे योग होते. विवाहानंतर लगेचच संतति झाल्यास मोकळा वेळ मिळणार नाही म्हणून ते थोडे नाराज झाले, परंतु मी समजावल्यानंतर विवाहानंतर नियमन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मला दिवस गेल्याची गोड बातमी दिली आणि काही दिवसांपूर्वी बाळ बाळंतीण सुखरूप असल्याची बातमी देखील. संतति न झाल्याने निराशाग्रस्त झाल्यावर ज्योतिषाची मदत घेण्यापेक्षा हा पर्याय चांगला नाही का?

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

दुभंगलेले सण

अश्विनी पौर्णिमेला मोठ्या मुलाला (आणि आजच्या काळात मुलीला) ओवाळून काहीतरी कपडा, साधारणपणे पांढरा, देण्याची पद्धत बऱ्याच मराठी कुटंबांमध्ये आहे. “अश्विनी आज करू का उद्या?”, असा प्रश्न या वर्षी कोजागिरीला बऱ्याच जणांनी विचारला. नेहमी एकाच दिवशी येणारे हे सण यावर्षी दोन लागोपाठच्या दिवशी आले आहेत. २०१६-१७ च्या पंचांगात, कालनिर्णयमध्ये, कोजागरी पौर्णिमा १६ ऑक्टोबरला आणि अश्विनी पौर्णिमा १७ तारखेला लिहिली आहे. त्यामुळे हा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. विशेषत: २०१६ या वर्षी नेहमी एकाच दिवशी येणारे अनेक सण दोन लागोपाठच्या दिवशी आले आहेत - नारळी पौर्णिमा १७ ऑगस्टला तर राखीपौर्णिमा १८ ऑगस्टला, नवरात्री/सरस्वती विसर्जन १० ऑक्टोबरला तर दसरा ११ ऑक्टोबरला. असं का? हा प्रश्न चिकित्सक मनाला पडणं साहजिक आहे; त्याचं उत्तर देण्यासाठी हा लेखप्रपंच!

हिंदू सण हे सूर्यचंद्रांच्या आकाशातील स्तिथीवर आधारित आहेत. ही स्थिती सूर्याच्या स्थितीवरून ठरणारा महिना (मास) आणि चंद्राचे त्याच्यापासूनचे अंतर दाखविणारी तिथी यांच्यावरून पाहतात. चंद्राचे सूर्यापासूनचे कोनीय अंतर ० अंशांपासून १८० अंशांपर्यंत आणि नंतर ३६० अंशापर्यंत रोज बदलत जाते. ते ० (किंवा ३६०) अंश असते तेव्हा अमावास्या असते आणि १८० अंश असते तेव्हा पौर्णिमा. हे अंतर एकूण ३० भागांमध्ये विभागले तर प्रत्येक १२ अंशाच्या भागाला एक तिथी म्हणतात. प्रत्येक सणाची तिथी आणि मास ठरलेला आहे. उदा. कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी करतात, राखीपौर्णिमा श्रावणातील पौर्णिमेला साजरी करतात वगैरे. साधारणपणे चंद्राच्या गतीमुळे एक तिथी जवळजवळ एक दिवस म्हणजे २४ तास चालते, परंतु हा काळ सूर्यचंद्रांच्या स्थितीनुसार बदलतो, त्यामुळे कधी कधी तिथी २४ तासांपेक्षा जास्त तर कधी २४ तासांपेक्षा कमी काळ राहते. या फरकामुळे, दर सूर्योदयाला तिथी बदलत नाही तर ती दिवसात कधीही बदलते. त्यामुळे पंचांगात किंवा दिनदर्शिकेत प्रत्येक तिथीची समाप्तीची किंवा सुरु होण्याची वेळ, सूर्योदयापेक्षा वेगळी आढळून येते.

याबरोबरीने दुसरी एक महत्त्वाची बाब पहावी लागते; ती म्हणजे, सणाचे प्रयोजन! त्यानुसार तो सण सूर्योदयानंतर साजरा करायचा की सूर्यास्तानंतर हे ठरते. महाशिवरात्री, नारळी पौर्णिमा, दिव्याची अमावस्या, नवरात्री, कोजागिरी पौर्णिमा हे सण रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर साजरे करायचे सण आहेत. या सणांना साधारणपणे रात्र जागवून ध्यानधारण करणे वगैरे शांतपणे करायच्या गोष्टी होणे अपेक्षित असते. दसरा, अश्विनी पौर्णिमा, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा हे सण दिवसा म्हणजे सूर्योदयानंतर साजरे करायचे आहेत. या सणांना दैवताची प्राणप्रतिष्ठापना, ओवाळणे वगैरे धामधुमीच्या गोष्टी करणे अपेक्षित असते. जे सण रात्री साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी सूर्यास्ताच्या वेळची तिथी पाहतात तर जे सूर्योदयानंतर साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी सूर्योदयाच्या वेळची तिथी पाहतात. ज्या तिथीला दोन्ही प्रकारचे सण साजरे होतात, ती तिथी त्या दिवशीच्या सूर्योदयाआधी सुरू होऊन सूर्यास्तानंतर संपत असेल तर दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होतात. पण जर ती तिथी सूर्योदयानंतर सुरू होत असेल तर रात्री साजरा होणारा सण त्याच दिवशी सूर्यास्तानंतर आणि दिवसा साजरा होणारा सण त्याच्या पुढच्या दिवशी तिथी चालू असेपर्यंत साजरा करतात. २०१६ साली अश्विन पक्षातील पौर्णिमा १६ ऑक्टोबरला दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी चालू होऊन १७ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी संपली, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा १६ तारखेला रात्री साजरी केली तर अश्विनी पौर्णिमा १७ तारखेला दिवसा! त्याच वर्षी श्रावणातील पौर्णिमा १७ तारखेला दुपारी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू झाली आणि १८ तारखेला दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी संपली. त्यामुळे नारळी पौर्णिमा १७ तारखेला रात्री आणि राखी पौर्णिमा १८ तारखेला सकाळी साजरी केली.

भारतात असे विशेषकरून लिहिण्याचे कारण म्हणजे, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा स्थानाप्रमाणे बदलत जातात, परंतु तिथी सुरू होण्याच्या आणि समाप्तीच्या वेळा मात्र सर्व ठिकाणी सारख्याच असतात. अगदी अचूक लिहायचे झाले तर प्रत्येक ठिकाणच्या सुर्योदय आणि सूर्यास्ताच्या UTC वेळा बदलतात कारण त्या ठिकाणच्या अक्षांशरेखांशावर अवलंबून असतात. पण तिथी सुरु होण्याच्या आणि संपण्याच्या वेळा मात्र अक्षांश आणि रेखांशावर अवलंबून नसल्याने त्यांच्या UTC वेळा ह्या सर्व ठिकाणी सारख्याच असतात. याचा परिणाम म्हणून भारतात जी तिथी सूर्योदयानंतर सुरू होईल ती यरोपमध्ये सूर्योदयापूर्वी सुरू झालेली असू शकते. यामुळे भारतात जे सण सलग दोन दिवशी साजरे होतील, ते युरोपमध्ये एकाच दिवशीही साजरे होऊ शकतात.

दुभंगलेल्या सणांमागचे हे कारण स्पष्ट झाले असेल अशी आशा करतो. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

राहु पितरांचा दर्शक

आपल्या ज्ञात अज्ञात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी शास्त्रकारांनी भाद्रपदमासातील कृष्णपक्षाची योजना केली आहे. या काळात कुळाचाराप्रमाणे श्राद्धाचे विहित कर्म करून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. आधुनिक काळात आपापल्या श्रद्धेप्रमाणे, सोयीप्रमाणे पितरांचे स्मरण करण्याच्या नव्या रुढी पडत चालल्या आहेत. आपल्या पूर्वजांकडून आपण संपत्ती, गुणदोष, चालीरीती, संस्कार अशा अनेक गोष्टी कळत नकळत घेत असतो. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट कर्मांमध्ये या वारशाचा वाटा असतो, त्याची कृतज्ञता म्हणून पितरांचे स्मरण करणे गरजेचे असते. जगाच्या पाठीवरील प्रत्येक धर्मात, संस्कृतीत काही ना काही प्रकारे पूर्वजांचे स्मरण केरण्याची प्रथा आहे ती यासाठी.

फलज्योतिषात राहूवरून पितामह किंवा पितर, पूर्वज पाहतात, पिढीजात शाप पाहतात. धनस्थानापासून घराणे पाहतात. या दोन गोष्टींवरून पितरांकडून आलेला वारसा दिसून येतो. पत्रिकेत राहूचे विशिष्ट योग असतील तर अशावेळी पूर्वजांचा मागोवा घ्यावा लागतो. आजच्या काळात या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवला जात नाही. मीही ह्या शक्यतांचा विचार शेवटी करत असे परंतु माझ्याकडे आलेल्या काही जातकांच्या अनुभवांनी हा विचार बदलायला लावला. त्यातील काही पुढे देत आहे. शेवटी प्रत्यक्ष ज्ञान तर्कालाही हरवते.

संकेतच्या घरात अचानक आजारपणे, अपघात, भांडणे सुरु झाली. त्यामागचे कारण सापडत नव्हते. त्याच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी चंद्र राहु युती होती, चंद्र राहु दशेत या युतीवरूनराहूचे गोचर भ्रमण सुरु होते. संकेतला मी त्यावर्षीचे श्राद्ध करण्याचे राहिले आहे का असे विचारले. संकेतच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या घरात श्राद्ध कधीच होत नव्हते, पण दरवर्षी ते पितरांचे स्मरण करून काही रक्कम देणगी म्हणून देत असत ती या वर्षी द्यायची राहिली होती. काही आर्थिक अडचणींमुळे तसे करणे शक्य झाले नव्हते. मी वर म्हणल्याप्रमाणे श्राद्ध याचा अर्थ पितरांचे स्मरण करून केलेले कर्म असा आहे; संकेतच्या पत्रिकेने मला त्या कर्मात पडलेला खंड बिनचूक दाखविला होता. ग्रहदशा आणि गोचर यामुळे हे कर्म राहून गेले की कर्म राहून गेल्याने अशा ग्रहस्थितीमुळे घरात वाईट घटना घडू लागल्या हे सांगणे अवड आहे.

संकेतचा प्रश्न लवकर सुटला. दरवेळी प्रश्न सुटतातच असे नाही. नीरजाबाईंना त्यांच्या नवऱ्याकडून आणि भावाकडून त्रास भोगावा लागत होता, त्यांच्या मुलीचा घटस्फोट होऊ घातला होता. त्यांच्या पत्रिकेत बुध राहु केंद्रयोग आणि त्यांच्या मुलीच्या पत्रिकेत बुध राहु युती होती. बुधाचा दोन्ही ठिकाणी धनस्थानाशी संबंध होता. मी त्यांना त्यांच्या घरात कोणाचा घातपाताने किंवा छळाने मृत्यू झाला आहे का हे विचारले. त्यांना आश्चर्य वाटून त्यांनी त्यांच्या आत्याने घरी होणाऱ्या छळाला कंटाळून जाळून घेतल्याचे सांगितले. बुध तरुण माणूस विशेषत: मुंजा मुलगा (मुंज होऊन लग्न न झालेला) दाखवतो. बुधावरून आत्या दिसत नाही, म्हणजे आत्याचाही छळ झाला तो अशा तरुण मुलाच्या/मुलीच्या मृत्यूचा परिपाक होता. अशावेळी मूळ कळल्याशिवाय उपाय करता येत नाही. सर्वपित्री श्राद्ध करूनही संकट टळत नाही. मी त्यांना अशा घटनेचा शोध घ्यायला सांगितला. परंतु आजवर तो शोध लागलेला नाही, भोगही संपलेले नाहीत.

सानिका आणि तिच्या नवऱ्याच्या दोघांच्या पत्रिकेत मंगळ राहुचे षष्ठ, व्यय स्थानातून योग होते; सानिकाच्या पत्रिकेत मंगळ, राहू प्रतियुती आणि तिच्या नवऱ्याच्या पत्रिकेत मंगळ राहु व्ययातील युती. मंगळ, राहू युती घरातील विधवा स्त्री, विशेषत: जिला घरात चांगली वागणूक मिळालेली नाही अशी, दाखवते. अशी युती जर षष्ठ, व्यय स्थानात असेल तर त्या स्रीच्या तळतळाटातून वाईट फळे मिळतात. पूर्वी घराघरातून अशा स्त्रिया असत, पण सध्याच्या काळात हे अभावाने आढळते. मी सानिकाला ही शक्यता बोलून दाखवली. तिने चौकशी केली असता तिच्या आजेसासूबाईंच्या बाबतीतच असे घडले असल्याचे आढळले. मागच्या अनुभवावरून काही वाईट घटना घडण्याआधीच तिला त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध किंवा दान किंवा इतर कर्म करण्यास सांगितले आहे.

शुक्रवार, १० जुलै, २०१५

नात्यातील गैरसमज - ज्योतिषाची मदत

अरविंद (नाव बदलेले आहे) माझ्याकडे त्याच्या मोठ्या बहिणीशी सध्या संबंध नीट नाहीत अशी तक्रार घेऊन आला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नक्की काय बिघडले होते हे त्याला कळत नव्हते. त्याने प्रश्न विचारला तेव्हाची पत्रिका मी मांडली (प्रश्नकुंडली १).
प्रश्नकुंडली १: ५ ऑक्टोबर, २०१३, १२:०४, पुणे

प्रश्नकुंडलीत प्रश्न, त्यासंबंधीची सर्व परिस्थिती यांचे प्रतिबिंब असते. मग ती परिस्थिती भूत, वर्तमान किंवा भविष्य या कुठल्याही काळातील असो. मोठे बहिण किंवा भाऊ लाभस्थानावरून पाहतात. चंद्र दशमात म्हणजे लाभाच्या व्ययात त्यामुळे मोठ्या बहिणीशी बिघडलेल्या संबंधाविषयी प्रश्न आहे दिसत होतं. त्याचप्रमाणे अष्टमातला चंद्र मानसिक ताणही दाखवत होता. त्यात चंद्र स्वनक्षत्रात, शुक्राच्या उपनक्षत्रस्वामीमध्ये, शुक्र लाभेश, स्त्रीदर्शक ग्रह, प्रश्नाची सर्व ओळख पटली. आता निदान करायचं होतं.

या कुंडलीत शुक्र, मंगळ केंद्रयोग आहे. शुक्र लाभेश आणि मंगळ पंचमेश, म्हणजे लाभाचा सप्तमेश. लाभस्थान मोठ्या बहिणीचं तर पंचमस्थान तिच्या पतीचं. त्यात ते शुक्र मंगळ म्हणजे विवाहसौख्याशी (की असौख्याशी) संबंधित ग्रह. मी अरविंदला त्याच्या बहिणीचे तिच्या पतीशी संबंध कसे आहेत हे विचारलं. असे नसते अगोचरपणे ज्योतिषाला करावेच लागतात. प्रश्नकुंडलीने दाखविलेल्या शक्यता पडताळूनच उत्तरं मिळतात. आश्चर्यचकित होऊन त्याने मला त्यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाल्याचं सांगितलं. दशमाचा उपनक्षत्रस्वामी राहु स्वनक्षत्रात, लाभात लाभाशी युती करताना दिसला. राहु अशा स्थतीत गैरसमज, मनात दाटलेली काळोखी, जळमटे दाखवितो. मी अरविंदला त्यांच्यात काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगितले. हे गैरसमज तिच्या वैवाहिक आयुष्यातील दु:खद घडामोडींमुळे आहेत ह्याची कल्पना दिली.

"मग आता काय करू? हे नातं पुन्हा कसं जुळवू?", अरविंदने विचारलं. प्रश्नकुंडली, प्रश्न दाखवते, त्याची पार्श्वभूमी दाखविते, आणि उत्तरंही देते. लाभाचा उपनक्षत्रस्वामी बुध दशमात पडलेला दिसला. तो दशमात असला तरीही लाभाशी होऊ घातलेल्या युतीत होता. बुध वाणी, संवादाचा कारक आहे. मी अरविंदला, स्वत: मागील सर्व गोष्टी विसरून बहिणीशी मोकळेपणाने बोलायला सांगितलं. अरविंदला अशा बोलण्यातून गैरसमज आणखी वाढतील का अशी चिंता पडली होती. मजा अशी की दशमाचा उपनक्षत्रस्वामी लाभातून दशमात चालला होता आणि लाभाचा उपनक्षत्रस्वामी दशमातून लाभात. स्वस्थानी जाणाऱ्या या ग्रहांनी, दोघे बहिण-भाऊ आपले मतभेद विसरून एकत्र येणार, हे मला निसंदिग्धपणे दाखवलं, आणि त्याप्रमाणे ते झालंही!

ग्रहदेखील न बोलता आयुष्यातलं नाट्य किती समर्थपणे दाखवतात? पहायला जरा कवीचं हृदय हवं इतकंच!

रविवार, २२ मार्च, २०१५

India Vs Bangladesh: prediction using astrology

I am not a cricket follower, but I like it because it helps me study astrology. My friends, relatives feed me with questions about these matches. World Cup 2015 is no different. "Will XYZ win the match?" is a common question.

For such questions, here are the rules (simplified) as per Krishnamurti system.
1. XYZ is represented by the ascendant and the seventh house indicates the opposite team/player. The sixth house being the twelfth to seventh, indicates the losses to opposite team and hence the sixth house is of prime importance in the horary charts.
2. If the Moon is significator of the sixth house, the horary chart provides the correct answer.
3. Whether XYZ will win or not, is indicated by the sub-lord of the sixth house. If the sub-lord is significator of the sixth, tenth (house related to one's accomplishments) or eleventh (house indicating one's desires and gains) house, XYZ wins, otherwise it looses.
4. Other rules like rules for retrograde planets are applicable here too.

Three different people, at three different moments asked me, "Whether India will win in the quarter final match against Bangladesh?". Follows the analysis of the horary charts
Chart 1: 18/Mar/2015 16:01:00, Pune

Chart 1 has the Moon in the star of Mars and is significator of houses 1, 7, 5, 9, and 10. Since it's not significator of the 6th house, I told that I can not answer this question at that moment. Sub-lord of the sixth house is the Sun, posited in the star of Saturn, who is retrograde. So, if I had to chosen to answer the question, I would have answered that India will loose, which would have been a wrong answer. India did win the match.

Chart 2: 19/Mar/2015 10:41:00, Pune
Chart 2 has the Moon in the star of Rahu and is signficator of houses 2, 3, 5, and 10. Since it's not significator of the sixth house, again I did not answer the question. The sub-lord of the sixth house is Jupiter, who is retrograde and is posited in the star of Mercury. Since retrograde Jupiter is significator of 10th and 11th house, I would have answered (if chosen to answer) that India will win the match after Jupiter gets into direct motion i.e. after 9th April. A one day match would never have stretched that far and I would have been a laughing stock.

Chart 3: 19/Mar/2015 08:49:00, Pune
Chart 3 has the Moon in the star of Rahu, who is posited in the sixth house. Now I could answer the question. Rahu is also sub-lord of the sixth house and is also significator of sixth house. So, I answered that India will win the match. By the way, Rahu also indicated that the batsmen on both sides will disappoint. Indian batsmen lost wickets easily and Bangladeshi batsmen couldn't even cross 200.






This method doesn't help betting. If the person who is betting is bound to loose money, an astrologer can not predict the winner. So, if somebody asks whether XYZ will win or not with the purpose of betting, the horary chart will show the outcome of the bet and not the outcome of match. If the outcome of the bet and the outcome of the match do not concur, astrologer's prediction will be falsified.

शनिवार, २१ मार्च, २०१५

भारत विरुद्ध बांग्लादेश, कोण जिंकेल? प्रश्नकुंडलीतील प्रश्नाचे महत्त्व

ज्योतिष शिकताना महत्वाचा म्हणजे सराव. तो मला घरच्यांकडून आणि मित्रांकडून भरपूर मिळत आलेला आहे. मला वास्तविक क्रिकेटमध्ये फार रस नाही, पण क्रिकेटच्या स्पर्धा सुरु झाल्या (हल्ली त्या वर्षभर चालूच असतात) की हे लोक मला सामन्यांचा निकालाबाबत प्रश्न विचारतात. अशा प्रश्नांमधून ज्योतिषाचे प्राथमिक धडे पक्के होतातच, पण ज्योतिषातील नियमांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करायला भरपूर वाव मिळतो. त्याचे एक उदाहरण म्हणजे, परवाचा भारत विरुद्ध बांग्लादेश सामना!

एखाद्या सामन्यात इच्छित संघ/खेळाडू जिंकेल का? प्रकारच्या प्रश्नांमध्ये कृष्णमूर्ती ज्योतिषाचे नियम खालीलप्रमाणे आहेत
१. लग्नस्थान हे जो जिंकेल का असा प्रश्न आहे त्याचे आणि सातवे स्थान हे विरोधी संघाचे/माणसाचे धरावे. विरोधी संघ हरतो, म्हणजे त्याचे व्यय स्थान फलित होते, म्हणून हा प्रश्न सहाव्या (सातव्याचे व्ययस्थान) स्थानावरून सोडवतात.
२. प्रश्नकुंडलीत चंद्र सहाव्या स्थानाचा कारक असेल तर ती कुंडली बरोबर उत्तर देते. 
३. इच्छित संघ/माणूस जिंकेल का याचे उत्तर सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी देतो. हा उपनक्षत्रस्वामी जर ६ (सातव्याचे व्ययस्थान) किंवा सहयोगी स्थाने १० (कर्तृत्व स्थान), ११ (लाभ, इच्छापूर्तीचे स्थान) यांचा कारक असेल तर इच्छित संघ जिंकतो, नाही तर हरतो.
४. इतर प्रश्नकुंडलीचे नियम उदा. वक्री ग्रहांचे कारकत्व इथेही लागू होतात.

भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारत जिंकेल का हा प्रश्न मला तीन जणांनी वेगवेगळ्या वेळी विचारला. त्या प्रश्नकुंडल्या खाली दिल्या आहेत. त्यांचा क्रमाने विचार करू.

प्रश्नकुंडली १: 18/Mar/2015 16:01:00 पुणे
प्रश्नकुंडली १ मध्ये चंद्र मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आहे. तो १, ७, ५, ९, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी रवि, शनिच्या नक्षत्रात असून शनि वक्री आहे, त्यामुळे जर मी उत्तर दिले असते तर भारत हरेल असे द्यावे लागले असते आणि अर्थातच ते चुकले असते.

प्रश्नकुंडली २: 19/Mar/2015 10:41:00, पुणे
प्रश्नकुंडली २ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आहे. तो २, ३, ५, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले.  सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी गुरु वक्री, बुधाच्या नक्षत्रात २, ३, ५, ८, १०, ११ या स्थानांचा कारक आहे. तो १०, ११ चा कारक असल्याने भारत जिंकेल असे उत्तर आले असते, पण गुरु मार्गी झाल्यावर, म्हणजे ९ एप्रिलनंतर. सामना कितीही रंगला तरी तो इतके दिवस नक्कीच चालला नसता, त्यामुळे हे उत्तर हास्यास्पद ठरले असते.

प्रश्नकुंडली ३: 19/Mar/2015 08:49:00, पुणे
प्रश्नकुंडली ३ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आणि राहु ६ व्या स्थानात, त्यामुळे प्रश्न बरोबर जुळला. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी राहु बुधाच्या नक्षत्रात ३, ४, ६, ११ या स्थानांचा कारक आहे, त्यामुळे भारत हा सामना जिंकेल असे सांगितले जे उत्तर खरे आले.  या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने विकेट फेकल्या आणि बांग्लादेशाच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावांमध्ये कंजुषी केली, ती राहुला साजेशी होती.






सट्ट्यासाठी या पद्धतीचा उपयोग होत नाही. सट्टेबाज जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा तो प्रश्न ठराविक संघ/खेळाडू जिंकेल का असा न दिसता, सट्टेबाजाला पैसे मिळतील का असा दिसतो. सट्टेबाजाला जर पैसे मिळणार नसतील, तर त्याने सट्टा लावलेला संघ जिंकत नाही. अशा परिस्थितीत मुळात कुंडलीत प्रश्न दिसत नाही, त्यामुळे ज्योतिषी उत्तर देऊ शकत नाही आणि दिलेच तर ते चुकते.

शुक्रवार, २० मार्च, २०१५

Misplaced luggage: Moon's guidance

Horoscope is the map of ecliptic, the apparent path of Sun around the Earth at a given moment and place on the Earth. All the astrological planets appear to move in circles close to ecliptic. The horoscope is the map of moving planets with respect to the stationary stars on the ecliptic. A birth-chart is the horoscope at the time of birth of a given person. But a birth-chart doesn't help in answering all the questions. The astrologer uses a horoscope casted at the time of posing a query; such a chart is known as Horary chart.

Moon is considered to the significator of the mind. Moon's signification in the Horary chart indicates the thoughts in the mind of the querist. An astrologer is able to guess the question from the Horary chart, even if the queries doesn't verbalise it. An astrologer can answer the question correctly, if only the question put forth by querist and the Moon's signfication match. The querist always brings the question and the answer together; an astrologer only reads the answer. This principal when used cleverly helps answering the questions correctly. 

On 9th March, 2015, at 15:21, I got a question as follows. Luggage was misplaced during flight and had not reached its owner even after two days. The person was going to move to another city the next day. The luggage contained all the essential things like forex, eatables, clothes and so on. Obviously the person himselves and his relatives in India were anxious.  Nirayana Horary chart (see the note) at that moment is given in the figure.

The Moon is in the 6th house and is lord of the third and fourth house. It is deposited in the star of Mars is in the eleventh house and is lord of the seventh and twelth house. So the Moon signifies houses 3, 4, 6, 7, 11 and 12. The 3rd and 12th house indicate travelling abroad, 11th house indicates gains or receipt of things, 4th house would indicate possessions of the person i.e. luggage in this case. I did not understand what was 6th house doing here. Whether the person would get what he desires, is indicated by the sub-star of the 11th house. Venus, the sub-lord of the 11th house is significator of houses 1, 6, 11, 2 and 10 (last two because of Mercury, the lord of star of Venus). The sub-lord of 11th house doesn't signify 4th house, which indicates luggage, so I was about to answer that the person will not get his luggage back (at least while he is in the same city). But the fact that sub-lord of 11th house (Venus) and the Moon both signified the 6th house attracted my attention. The 7th house indicates the partner in any deed. In this case, it's the airline company. The 6th house indicates the things to be received from to the 7th house. The question here is not about lost luggage, but whether it can be obtained from the airline company. It became evident that I should be giving importance to the 6th house, rather than the 4th house. No book could have taught me that. So, with a little hesitation, I told that the person will get his luggage before Moon leaves the star of Mars on the same day. To the person's surprise, the luggage reached his hotel before he reached after the days work. The Moon posed the question and answered it as well. Don't they say that a question and its answer go hand in hand. 

Note: The question was asked by in-laws of the person travelling, so the Horary chart is casted by rotating chart by the 5th and then the 7th house.

रविवार, १५ मार्च, २०१५

गहाळ सामान: चंद्राचा प्रश्न आणि त्याचेच उत्तर

कुंडली म्हणजे सूर्य पृथ्वीभोवती ज्या वर्तुळातून फिरताना दिसतो, त्या मार्गाची (क्रांतीवृत्ताचा) नकाशा. मजा अशी की चंद्रासकट सगळे ग्रह (ज्योतिषीय अर्थाने) ह्याच वर्तुळाजवळून फिरताना दिसतात. क्रांतीवृत्तावरील तारे पृथ्वीवरून स्थिर दिसतात, त्यामुळे ह्या नकाशात, प्रामुख्याने ग्रहांची स्थिर ताऱ्यांच्या सापेक्ष स्थाने दाखवलेली असतात. जन्मकुंडली, म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या जन्मवेळचा क्रांतीवृत्ताचा नकाशा. ज्योतिषाला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जन्मकुंडलीवरून देणे शक्य असतेच असे नाही. अशावेळी ज्योतषी प्रश्न विचारलेल्या वेळच्या क्रांतीवृत्ताच्या नकाशाचा वापर करतो, त्या नकाशाला प्रश्नकुंडली म्हणतात.

प्रश्नकुंडली: ९ मार्च २०१५ १५:२१, पुणे
चंद्र हा मनाचा कारकग्रह मानला आहे. चंद्राचे कारकत्व प्रश्न विचारायला येणाऱ्याचे मन कुठे आहे हे दाखवते. प्रश्नकुंडलीची मजा अशी की, प्रश्न विचारणाऱ्याने प्रश्नाचा उच्चार जरी केला नाही (तो मनात ठेवला), तरीही प्रश्नकुंडलीवरून ज्योतिषी प्रश्न काय आहे याचा अंदाज लावू शकतो. याचा उपयोग ज्योतषी प्रश्न ताडून पाहण्यासाठी करतात. विचारलेला प्रश्न खरंच तसाच विचारणाऱ्याच्या मनात आहे का हे पहिल्यांदा पाहिले जाते. तसे असेल तर तीच प्रश्नकुंडली प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीही वापरली जाऊ शकते. थोडक्यात विचारणारा प्रश्न आणि उत्तर बरोबरच घेऊन येत असतो. ज्योतषी फक्त ते उत्तर वाचून दाखवतो. प्रश्नकुंडली ज्योतिषाला नवीन काहीतरी शिकवूनही जाते.

९ मार्च २०१५ रोजी १५:२१ ला मला प्रश्न विचारला तो असा. हे गृहस्थ परदेशी गेले होते. त्यांचे सामान तिकडे दोन दिवस झाले तरीही पोचले नाही. दुसऱ्या दिवशी हे गृहस्थ दुसऱ्या शहरात जाणार होते. तिथे असेपर्यंत सामान मिळेल का? सामानात सर्व परकीय चलन, खाण्याचे पदार्थ (शाकाहारी लोकांसाठी जपान, युरोपातील काही देशात जायचे असेल तर गरजेचे), कपडे सगळेच होते. त्यामुळे चांगलीच गैरसोय होत असणार. त्यावेळची प्रश्नकुंडली(टीपा पहा) दिली आहे.

या कुंडलीत चंद्र षष्ठस्थानात, तृतीयेश, चतुर्थेश, आणि त्याचा नक्षत्रस्वामी मंगळ लाभात, सप्तमेश, व्ययेश. म्हणजे चंद्र हा ३, ४, ६, ११, १२ या स्थानांचा कारक आहे. यातील ३, १२ एकत्र ही स्थाने प्रवास विशेषत: परदेशप्रवास दाखवतात. ११ हे स्थान काहीतरी मिळवण्यासंबंधीचा प्रश्न दाखवते. ४ ह्या स्थानाने एकूण सामान दाखवले. पण ६ व्या स्थानाचा संदर्भ मला लागेना. एखादी गोष्ट मिळेल का, ह्यासाठी ११ व्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी त्या गोष्टीसंबंधी स्थानाचा कारक असावा लागतो. ह्या कुंडलीला लाभाचा उपनक्षत्रस्वामी शुक्र १, ६, ११ (शुक्राचा नक्षत्रस्वामी बुध) २, १० या स्थानांचा कारक आहे. तो ४ चा कारक नाही, म्हणून सामान मिळणार नाही असे उत्तर द्यावे का अशा विचारात मी असताना, चंद्र ६ व्या स्थानात आहे आणि लाभाचा उपनक्षत्रस्वामीही ६ चा कारक आहे, हे विशेष वाटले. सातवे स्थान एखाद्या बाबतीतील सहयोगी दाखवते. या प्रश्नात विमानप्रवास ही बाब धरली तर सहयोगी म्हणजे विमानकंपनी. ६ हे ७ व्याचे व्यय (आधीचे) स्थान, विमानकंपनीच्या ताब्यातून सुटणाऱ्या गोष्टी दाखवते. इथे हरवलेले सामान मिळवणे ही समस्या नाही, तर विमानकंपनीकडून ते मिळेल का हा प्रश्न असल्याने सामानाच्या कारक स्थानापेक्षा ६ वे स्थानच महत्त्वाचे आहे, हे चंद्राच्या स्थानाने माझ्या लक्षात आले. ह्या तर्काला पुस्तकी आधार नसल्याने मी साशंक मनाने, सामान मिळेल असे सांगितले. चंद्र मंगळाच्या नक्षत्रात आणि मंगळ लाभात असल्याने दिवस संपायच्या आत मिळेल असेही सांगितले. खरोखरीच त्या दिवशी हे गृहस्थ दिवसभराची कामे आटपून त्यांच्या हॉटेलवर जायच्या आत विमानकंपनीने ते तिथे पोचवले होते. चंद्रानेच प्रश्न टाकला आणि त्यानेच उत्तरही दिले. प्रश्न आणि उत्तर शेजारी असतात ते असे.

टीप: हा प्रश्न मला सासऱ्यांनी ज्येष्ठ जावयाबद्दल विचारला असल्याने, पंचमाचे सप्तम स्थान लग्नी ठेवून काढलेली कुंडली दिली आहे.

रविवार, १८ जानेवारी, २०१५

Makarsamkrant and Uttarayan, are they related?

The sun appears to move in a specific circle, if observed from the Earth. This circle is called the Ecliptic. This circle has been divided into 12 equal angular parts, forming 12 signs of the Zodiac. When the Sun enters Nirayana Makar sign, the day is called Makar Samkranti in India. This day is assumed to mark the beginning of Uttarayana. Accoding to the Manusmriti chapter one, verse 67, Uttarayana is considered as the day of Gods and thus the beginning of that day being Brahmamuhurta (auspicious time at the beginning of any day)  for Gods, the day of Makar Samkranti is considered very auspicious. But does Makar Samkranti really mark the beginning of Uttarayana?

From the Earth, the Sun appears to rise in the East, but it rises exactly at the East only on two days of the year. On other days, it appears to rise either towards the South or the North of the East. The period of the year, when the point where Sun appears to rise on the horizon moves towards the is called Uttarayana (Uttara meaning the North). The period when the same appears to move towards South is called Dakshinayana (Dakshina meaning the South).

If we observe the rising Sun everyday, we will see that the point on the horizon where the Sun appears to rise moves towards the South between 22nd June to 21st December. The same appears to move towards the North during the other half of the year. One can confirm these observations with high accuration using a software like Stellarium. It's very much evident from these observations that Dakshinayan ends on 21st or 22nd December and Uttarayana starts on the same day. Uttarayana does not start on the day when the Sun enters Nirayana Makar sign i.e. Makar Samkranti

The question is when should we observe the festival? The celebrations on this day includes consumption of sweets made of sesame and jaggery, wearing dark (preferably black) colored clothes, offering the nascent crops of carrots, berries to Gods. All these things are related to the Winter. Hence this festival should be celebrated in the middle of the Winter i.e. on the day of Winter Solstice i.e. 21st or 22nd December. Truly speaking, this festival is related to Uttarayana and better be observed when Uttarayana starts.

Vernal, Autumnal equinox, Winter and Summer solstice are four important points on the apparent path of Sun around the Earth. These points are not fixed with respect to the fixed stars. Every year they move against the direction of Nirayana Zodiac. Around 499 A.D. Sun used to be near Revati (ζ Piscium) star at the time of Vernal equinox, today it's near UttaraBhadrapada (γ Pegasi and α Andromedae) star. The same year, at the beginning of Uttarayana Sun must be at the start of Nirayana Makar sign. In the fifth century, the day of beginning of Uttarayana and the day when the Sun entered Nirayana Makar sign coincided. Marking the entry of the Sun into a sign was much easier than marking the end of movement of sunrise of point towards the South, since the later movement is slower than the Sun's movement and its accuracy is hampered by the refraction of Sun's rays in the Earth's atmosphere. So, the Pandits at that time would have chosen Makar Samkranti to mark the beginning of Uttarayana, since the error between these two events was tolerable at that time. The mathematics and the instruments too weren't that advanced to mark these events accurately. But now that we have computers for fixing positions of the planets upto 1000th part of degree accurately, we should not be following this 1500 years old erroneous tradition.

Other important factor to consider here, is after Makar Samkranti the Sun remains in signs ruled by Saturn for two consecutive months. The Sun who is the king amongst the planets, is significator of wealth, pleasures, youth, light, gold, where as the Saturn who is the servent amongst the planets, is significator of poverty, sorrow, old age, darkness, lead. Sun's dwelling in the signs governed by a planet so opposite in signification is not considered auspicious. How can then we celebrate the start of this period with a festival dedicated to it? This is the reason, Makar Samkranti is never considered fully auspicious.  Celebrate Uttarayana on it's true beginning i.e. 21st or 22nd December and it becomes completely auspicious.

Well, even today Makar Samkranti falls during the Winter, but after a thousand years, it will fall in the heat of summer. Consuming jaggery and sesame and wearing dark clothes in the summer would have disastrous effects on our health and we wouldn't have nascent carrots and berries to offer to the Gods, in the heat of the summer.

शनिवार, १७ जानेवारी, २०१५

मकरसंक्रांत आणि उत्तरायण वास्तविक संबंध

पृथ्वीवरून पाहिल्यास सूर्य एका ठराविक वर्तुळात फिरताना दिसतो. या वर्तुळाला क्रांतीवृत्त असे म्हणतात. संस्कृत धातू क्रम् यावरून क्रांती हा शब्द आला आहे. क्रम् याचा अर्थ ओलांडणे, चालणे, फिरणे असा आहे. सूर्य या वर्तुळावरून फिरतो म्हणून ते "क्रांतीवृत्त". या क्रांतीवृत्ताचे बारा भाग कल्पिलेले आहेत त्यांना राशी असे म्हणतात. संक्रांत याचे मूळ सुद्धा क्रम हाच धातू आहे, त्यावरून एखाद्या राशीत सूर्याने प्रवेश करणे याला संक्रांत म्हणतात. प्रत्येक राशीच्या नावे एक याप्रमाणे १२ राशींच्या १२ संक्रांती असतात. सूर्य निरयन मकरराशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात. या दिवशी उत्तरायण सुरु होते अशी समजूत आहे. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस (मनुस्मृती अध्याया १ श्लोक ६७) मानला असल्याने, त्या दिवसाची सुरुवात म्हणजे देवांचा ब्राह्ममुहूर्त म्हणून, हा दिवस विशेष मानला जातो. परंतु खरंच मकरसंक्रांत ही उत्तरायणाची सुरुवात आहे का?

उत्तरायण म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी, पृथ्वीच्या उत्तरगोलार्धातून सूर्याचे भ्रमण कसे दिसते ते पाहू. सूर्य पूर्वेकडे उगवताना दिसत असला तरी, तो अगदी पूर्वेकडून फक्त दोनच दिवशी उगवतो. इतर दिवशी तो पूर्व-उत्तर किंवा पूर्व-दक्षिण या दिशांमध्ये उगवतो. ज्या काळात सूर्योदयबिंदू  (क्षितिजावर जिथे सूर्योदय होतो तो बिंदू) थोडा थोडा दक्षिणेकडे सरकतो, त्या काळाला दक्षिणायन (अयन म्हणजे सरकणे) म्हणतात. ज्या काळात सूर्योदयबिंदू उत्तरेकडे सरकतो, त्याला उत्तरायण म्हणतात.

रोज सूर्योदय उगवताना त्याचे निरीक्षण केले तर असे दिसून येईल की २२ जून ते २१ डिसेंबर या कालावधीत सूर्योदयबिंदू थोडा थोडा दक्षिणेकडे सरकतो, आणि २२ डिसेंबरनंतर पुन्हा २१ जूनपर्यंत तो उत्तरेकडे सरकतो. वर्षभर ज्यांना हे निरीक्षण करायचा कंटाळा आहे, त्यांनी Stellarium सारखी प्रणाली वापरून खात्री करावी. म्हणजे दक्षिणायन २१ डिसेंबर किंवा २२ डिसेंबरलाच संपते आणि तेव्हाच उत्तरायणदेखील सुरु होते. त्यामुळे मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरु होत नाही हे सूर्यप्रकाशाइतकेच ढळढळीत सत्य आहे.

आता प्रश्न असा आहे की मकरसंक्रांतीला सण म्हणून जे जे करतात, उदा. तीळगुळ वाटणे, गुळपोळीचा आहार, काळे कपडे घालणे, वाण देणे, कोवळ्या भाज्या, बोरे, फळे सुगड्यात भरून ते वाण देवीला देणे, ह्याच वस्तूंनी लहान बाळांना आंघोळ घालणे (बोरनहाण) ह्या गोष्टी कधी कराव्यात? ह्या प्रत्येक गोष्टीचा संबंध हिवाळ्याशी आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या मध्यभागी म्हणजेच दक्षिणायन संपताना डिसेंबरमध्ये २१ किंवा २२ तारखेला त्या करणे योग्य. हा सण खरेतर मकरसंक्रांतीचा नसून उत्तरायणाशी संबंधित आहे, तो उत्तरायण सुरु होतानाच करणे इष्ट!

मुळात मकरसंक्रांत आणि उत्तरायणाची सुरुवात हा संबंध कुठे आला ते पहावे लागेल. क्रांतीवृत्तावरील चार बिंदू सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे महत्त्वाचे ठरतात: क्रांतीवृत्त आणि अवकाशीय विषुववृत्त (पृथ्वीच्या विषुववृत्ताचे अवकाशतील प्रक्षेपण) जिथे एकत्र येतात ते दोन बिंदू (वसंतसंपात, शरदसंपात), दक्षिणायन आणि उत्तरायण सुरु होताना सूर्य जिथे असतो ते दोन बिंदू. हे बिंदू तारकापुंजांच्या सापेक्ष स्थिर नसून ते दरवर्षी राशीचक्रात मागे सरकतात. साधारण इ.स. ४९९ मध्ये वसंतसंपात रेवती ताऱ्याजवळ होता (सध्या तो उत्तराभाद्रपदा नक्षत्रात आहे). त्यावर्षी उत्तरायण सुरु होताना सूर्य निरयन मकरराशीच्या आरंभी असला पाहिजे. या काळात मकरसंक्रांत (सूर्याचा निरयन मकर राशीत प्रवेश) आणि उत्तरायण हे एकाच दिवशी होत असावे. सूर्योदयबिंदूचे अयन अतिशय हळू होत असते, त्यामुळे दिवसागणिक त्यात फार फरक दिसत नाही. त्यातच वातावरणाच्या प्रभावामुळे सूर्योदयबिंदू नुसत्या निरीक्षणाने निश्चित करणे कठीण असते. त्यामुळे उत्तरायण निश्चित कधी सुरु झाले किंवा होईल हे सांगणे नुसत्या निरीक्षणाने अवघड असते. त्याउलट सूर्याचा मकरराशीत प्रवेश निश्चित करणे तुलनेने सोपे. १५०० वर्षांपूर्वीची साधने, गणितातील प्राविण्य विचारात घेता, मकरराशीत प्रवेशावेळी उत्तरायण साजरे करणे हा मार्ग तेव्हाच्या शास्त्रकारांनी घालून दिला असावा. त्यातील चूक फारशी लक्षात येण्याजोगी नसल्याने ते चालून गेले असावे. पण आज गणितातील आणि संगणकीय सुधारणांमुळे ग्रहांची अगदी विकलेपर्यंत स्थिती निश्चित करता येत असताना, आपण ही १५०० वर्षांपूर्वीची प्रथा अजूनही आंधळेपणाने पाळणे बरोबर नाही.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मकरसंक्रांतीपासून पुढे दोन महिने सूर्य शनिच्या राशींमध्ये असतो. रवि हा ग्रहमंडलातील राजा वैभव, तारुण्य, सोने, जीवन, सुख, उत्साह यांचा कारक तर शनि हा ग्रहमंडलातला दास दारिद्र्य, वार्धक्य, शिसे, मृत्यू, दु:ख, नैराश्य यांचा कारक. ह्या दोन राशी त्यांच्या स्वामीप्रमाणेच सूर्याला विपरीत गुणांच्या आहेत. त्यात सूर्य प्रवेश करत असतानाचा दिवस सण म्हणून कसा साजरा करता येईल? त्यामुळेच की काय पण हा सण लग्नानंतर पहिला सण असल्यास साजरा करत नाहीत आणि किंवा या दिवशी कोणी शुभकार्याचा आरंभही करत नाहीत. याउलट २१-२२ डिसेंबरला हा सण साजरा केल्यास कुठलेच अशुभाचे सावट त्यावर राहणार नाही.

अजूनही मकरसंक्रांत थंडीत येत असल्याने फारसा फरक पडत नाही, परंतु आणखी हजार वर्षांनी मकरसंक्रांत उन्हाळ्यात येऊ लागेल तेव्हा ऊष्ण तीळगुळ खाऊन कसे चालेल आणि सुगड्याचे वाण द्यायला तेव्हा भर उन्हाळ्यात कोवळी गाजरे, बोरे कशी मिळतील?

रविवार, ४ जानेवारी, २०१५

Buying desired house.

It's very common these days to relocate to other city, state or even country for job, business. Easy loans make it even easier to own a house earlier in the life. But money alone isn't enough to buy a house in our dreams. Astrologer can help you in these matters by providing insights into the future.

Rohini had zeroed down onto a house that she had liked most, the location was good too. Money wasn't a problem. Obviously, there were other buyers in the game. On 5th January 2014 at 9:47 PM IST she asked me whether she would be able to buy that home.  Given is the Nirayana horoscope at the time at Pune (where I was located then).

Moon is in Jupiter's star and Jupiter is in the eleventh house, which signifies matters related to one's desires, likings and wishes. The cusp of the fourth house (which signifies matters related to one's house) falls in sub of Moon. Thus Moon indicates the question related to house one likes. That's the fun with the horary charts, that they indicate the query even though queriest doesn't verbalize it.

In Krishnamurti system, the sub in which the cusp of house in question falls indicates whether the answer to the query would be favourable or unfavourable. If the sub signifies the complementary houses and is situated in the star of planet in direct motion, the answer is favourable otherwise unfavourable. For the given horary chart, Moon is the sublord of fourth house and it is in Jupiter's star, thus indicating unfavourable answer. So, I told Rohini that she won't be able to buy the house. Further, the cusp of eleventh house falls in the sub of Saturn. Saturn is situated in the third house. Third house being the house before fourth, negates the fourth house. Hence the sublord of cusp of eleventh house negates the house, indicating the Rohini herself wouldn't want to buy that house.

"You wouldn't want to buy that house.", I answered after examining the horoscope.
"I liked that house and want to buy it desperately. How would then you say so?", Rohini was clearly confused by the irony.
"The horoscope tells me so. Go ahead and try buying the house". I was sorry to answer that way, but an astrologer is a mere messenger of the skies.

Rohini made her bid on 14th January and consulted the loan agent. Same day the loan agent pointed out that there will be problems in securing loan for that particular house. Rohini withdrew the offer within next hour. Because of my prediction, she was ready for the outcome and started searching new home.

From her birth-chart, I predicted that she would be able to buy house between June 2014 and September 2014. The timelines predicted from birth-chart can have a sway of about 2-3 months depending upon the accuracy of the birth-time. In April 2014, she proposed to buy a different house and settled in it by June 2014.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

घर घेता येईल का?

नोकरी, धंद्याच्या निमित्ताने आपले गाव/शहर सोडून परक्या शहरात, राज्यात किंवा अगदी परदेशात जाणे ही खूप नित्याची गोष्ट झाली आहे. आपले राहते घर सोडून परक्या मुलखात नोकरी करताना कधी ना कधी तरी तेथे घर घेणे गरजेचे होते. कर्जाच्या सुलभतेमुळे तरुण वयात स्वत:चे घर घेणे शक्यही होते. परंतु पैशाची सोबत असूनही बरेच शोधून मनासारखे घर मिळतेच असे नाही. अशावेळी कुठे तडजोड करावी का, का वाट पहावी अशा द्विधा मन:स्थितीत ज्योतिषाची मदत होते.

रोहिणीला (नाव बदलले आहे) बरीच शोधाशोध केल्यावर एक घर पसंत पडले होते. पैशाची सोबत होती. अर्थात अशा घर घेऊ इच्छिणारेही पुष्कळ होते. तिने मला हे घर तिला घेता येईल का, हा प्रश्न ५ जानेवारी २०१४ रोजी रात्री ९:४७ ला केला.  त्यावेळची पुण्याची (मी जिथे तो प्रश्न सोडवला) कुंडली खाली दिली आहे.

प्रश्नकुंडली: ५/जाने/२०१४ २१:४७, पुणे
चंद्र गुरुच्या नक्षत्रात आणि गुरु लाभात म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणार का हा प्रश्न होता, पण त्याचे घराशी असलेले नाते चतुर्थाच्या उपनक्षत्रस्वामी असलेल्या चंद्राने स्पष्ट केले. प्रश्नकुंडलीची ही मजा आहे, की प्रश्नकर्त्याने जरी प्रश्न विचारला नाही तरी ज्योतिषाला तो प्रश्नकुडलीद्वारे बरोबर कळतो.

कृष्णमूर्ती ज्योतिषात हो/नाही प्रकारचे उत्तर पाहताना, त्या भावाचा उपनक्षत्रस्वामी पाहतात. हा उपनक्षत्रस्वामी आणि त्याचा उपनक्षत्रस्वामी मार्गी असून जर पूरक भावांचे कारक असतील तर हो असे उत्तर असते. या कुंडलीला चतुर्थाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र वक्री गुरुच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे रोहिणीला मी तुला हे घर घेता येणार नाही असे सांगितले. लाभाचा उपनक्षत्रस्वामी शनी तृतीयात आहे; तृतीयस्थान हे चतुर्थाचे व्ययस्थान. इच्छापूर्तीचे स्थान घराला नकार देत आहे म्हणजे रोहिणीचीच हे घर घ्यायची इच्छा होणार नाही. यापुढचे संवाद असे -
"तुला स्वत:लाच घर घेण्याची इच्छा होणार नाही", मी.
"मला ते घर पसंत आहे असे सांगुनही तू हे सांगतोस?", रोहिणी.
"हो, माझ्यासमोरची पत्रिकाच तसे सांगते आहे. तू तुझे प्रयत्न कर", मी.
रोहिणीला फार प्रयत्नाने पसंत पडलेले घर आपल्याला मिळणार नाही ह्याचे दु:ख होतेच. ज्योतिषाला सत्याचे कडू औषध पाजून प्रश्नकर्त्याला आगाऊ सूचना द्यावी लागते.

रोहिणीने हे घर घ्यायचा प्रस्ताव घरमालकासमोर १४ जानेवारी रोजी ठेवला आणि कर्जासाठी बोलणी सुरु केली. तिच्या कर्ज सल्लागाराने तिला १४ जानेवारी रोजी ह्या घरासाठी कर्ज घेण्यात अडचणी येतील त्यामुळे हे घर घेऊ नये असा सल्ला दिला. रोहिणीने तत्परतेने तासाभरात स्वत:हून प्रस्ताव मागे घेतला.

असे प्रश्नकर्ते मला आवडतात. ज्योतिष प्रयत्न करु नका असे कधीच सांगत नाही, उलट प्रयत्नांना योग्य काळ आणि दिशा देण्याचे काम करते. त्याचबरोबर प्रयत्नांना अपयश आले तर त्यांची कारणमीमांसा करून निराश न होण्यास मदत करते. रोहिणीला घर मिळणार नाही याची कल्पना आधीच आल्याने, तिने प्रस्ताव मागे घेतानाच पुढचे घर पहायची तयारी केली. तिने ग्रहांचा कौल पाहून तो प्रस्तावच पुढे ठेवला नसता तर तिला पसंत पडलेले घर  केवळ ज्योतिषाच्या सांगण्यावरून सोडले ही गोष्ट खात राहिली असती, आणि तसे व्हायला कारणीभूत मी झालो म्हणून मलाही!

तिच्या जन्मकुंडलीवरून मी तिला जून २०१४ ते सप्टेंबर २०१४ ह्या काळात घर घेता येईल असे सांगितले, अर्थात जन्मकुंडलीवरून निश्चित केलेल्या काळात जन्मवेळेतील फरकाप्रमाणे २-३ महिन्यांचासुद्धा फरक येऊ शकतो याची कल्पना देऊन प्रयत्न तसेच चालू ठेवण्यास सांगितले. एप्रिल २०१४ च्या सुमारास तिने दुसऱ्या घराचा व्यवहार पूर्ण केला, घरातील दुरुस्ती आणि बदल होऊन रुळण्यास जून २०१४ उजाडले.

रोहिणीची घर घेण्याची इच्छा जशी पूर्ण झाली तशी सर्व गृहेच्छुकांची होवो!
गृहचतुर्थाची कहाणी लाभोत्तरी सुफळ संपूर्ण!

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०१४

Research and experiments related to child birth

There are many systems or schools in Astrology. Each system has its own set of rules, though sometimes contradictory. Obviously, not all of them yield correct results when applied. Most of the rules are given without any theorematic treatment. That raises a question, "how does one sort the correct ones from the wrong ones?". Simple answer is to match them against the actual observations. But the method is tedious as we will see next. We started some experiments in the context of child birth esp. the first child birth. This article describes our efforts so far and some interesting outcomes.

To understand the terminology, please use the reference pages available from the sidebar.

Method

With the limited time in our hands, we could use only one system of astrology for the experiments. Given the high level of accuracy and simplicity, we chose Krishnamurti system.  We used Statistical Hypothesis Testing to validate the rules against the observations.

We use following rules from Krishnamurti's readers. We did not use the rules specifying the effects of aspects of other planets with Rahu and Ketu, and aspects of planets in general.
  1. in its Dashas, a planet indicates effects related to the house/s it signifies 
  2. A planet signifies following houses
    1. The house which it occupies
    2. The house/s it rules
    3. The house/s ruled and occupied by the lord of Nakshatra occupied by the planet.
  3. Whether the effects are desired or undesired is decided by the lord of the sub of the planet. The signification of the sub-lord is decided by rule 2.
  4. Rahu and Ketu also (apart from the rule 2) signify the houses occupied and ruled by the lord of Rashi where they are placed.
According to Krishnamurti system, dasha of planets signifying the second, fifth and eleventh houses  should run when the first child is born to a person to effect the increase in family, and child-birth to the person and its spouse. Dasha lords should transit (gochar) the nakshatras of planets signifying these houses.

Observation

We studies the horoscopes of 150 parents and their first children. The observations are as follows
  1. 85% parents had the dashas of planets signifying fifth house. The probability of running dasha of significator of the fifth house at any random time is 70% according to rules used above. Thus the hypothesis that "when first child is born the dashas of planets signifying fifth house are running" holds for the data studied with type 1 error less than 1%.
  2. We did not see such a high correlation for second and eleventh house, esp. in case of fathers. In case of mothers however second house was observed to be significant next to the fifth house.
In this case, we observed that although the rule specifies the three houses viz. second, fifth and eleventh being significant, only two houses viz second and the fifth were found to be significant in the observed data and that too for mothers. Thus the method allows validation of existing rules and at the same time shows the need for improving those rules.

Hence we are continuing the study to validate existing rules and hypothesizing new rules as needed. According to the rules of hypothesis testing, in the given context, we need samples in the range of thousand to conclusively discard or accept a hypothesis. It is possible to analyse large data within minutes using computers, so today it's possible to experiment using such methods (something which wasn't possible when Krishnamurti formulated his method). We are collecting the birth details of parents and their first children to continue our studies.

If you are interested in providing your details, please use Google Form  here.

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

संततियोग प्रयोग आणि संशोधन

फलज्योतिषात अनेक पद्धती प्रचलित आहेत. ह्या प्रत्येक पद्धतीत अनेक नियम आहेत, त्यातले काही परस्परविरोधीही आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे,  ह्यातल्या कित्येक (जवळजवळ सगळ्याच) नियमांना सिद्धांताची जोड दिसत नाही. एखादा नियम तसा का आहे, याचं विवेचन फारसे आढळत नाही. किंबहुना त्यामुळेच ज्योतिषाला अवैज्ञानिक शास्त्र म्हणवले जाते. यातले बरेच नियम लागू पडताना दिसतात आणि बरेच नाही. हा नीरक्षीर विवेक कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्याचे सोपे परंतु कष्टप्रद उत्तर म्हणजे, प्रत्यक्ष निरीक्षणांशी ज्या नियमांचा मेळ बसतो ते नियम स्वीकारणे आणि उरलेले सोडून देणे. आम्ही "प्रथम संतति कधी होते?" हा प्रश्न घेऊन हे प्रयोग सुरु केले.

या लेखात वापरलेल्या ज्योतिषीय संकल्पना समजण्यासाठी संदर्भपृष्ठांचा वापर करावा.

पद्धत

हातात असलेला वेळ आणि उपलब्ध साधने याचा विचार करता कुठल्यातरी एकाच पद्धतीचा उपयोग करणे शक्य होते. कृष्णमूर्ती ज्योतिष  पद्धतीचा सोपेपणा आणि अचूकता ह्या दोन गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनुसार प्रयोग सुरु केले. ह्या नियमांना सैद्धांतिक बैठक नसल्यामुळे, त्यांची गुणवत्ता मोजण्यासाठी Statistical Hypothesis Testing चा वापर केला. ह्या पद्धतीत एखादे गृहितक निव्वळ शक्यतेमुळे (Random Chance) खरे वाटत नाही ना हे तपासले जाते.

सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची वेगवेगळी संस्करणे वापरली जातात. आम्ही कृष्णमूर्तींच्या Readers मधील खालील नियम वापरले. विशेषत: राहु, केतू यांचे ग्रहांच्या दृष्टी आणि योगांमुळे बदलणारे कारकत्त्व तसेच ग्रहांचे दृष्टी आणि योगांनी बदलणारे कारकत्त्व विचारात घेतले नाही.
  1. ग्रह त्याच्या (विंशोत्तरी) दशांमध्ये त्याच्या कारकभावांसंबंधी फळे देतो.
  2. ग्रहाचे कारकभाव पुढीलप्रमाणे
    1. ग्रह जिथे आहे ते भाव
    2. ग्रह ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
    3. ग्रहाचा नक्षत्रस्वामी जिथे आहे आणि तो ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
  3. या फळांची अनुकूलता उपनक्षत्रस्वामीवरून ठरते. उपनक्षत्रस्वामीचे कारकत्त्व वरील नियमाप्रमाणे मानावे.
  4. राहु आणि केतू त्यांच्या राशीस्वामी जिथे आहे आणि ज्या भावांचा स्वामी आहे त्या भावांचे कारक होतात.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार प्रथमसंततिच्या वेळी कुटुंबात वाढ होते, जातकाला तसेच त्याच्या जोडीदाराला पहिले अपत्य मिळते. त्यामुळे या वेळी धन, पंचम आणि लाभ या भावांच्या कारक ग्रहांच्या दशा चालू असतात.

निरीक्षणे

२०० पालक आणि त्यांच्या पहिल्या संतति यांच्या जन्मवेळा, जन्मस्थळे यांच्या माहितीवरुन त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून केलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे
  1. ८५% पालकांच्या बाबतीत प्रथमसंततिच्या वेळी पंचमभावच्या कारक ग्रहांच्या दशा (महा, अंत:, वि) चालू होत्या. वरील नियमांनुसार ठराविक वेळी एखाद्या भावाच्या कारक ग्रहाची दशा चालू असण्याची निव्वळ शक्यता (Probability) ७०% असते. म्हणजेच प्रथम संतति आणि पंचमभावाच्या कारक ग्रहाची दशा याचा संबंध निव्वळ शक्यतेपेक्षा जास्त आहे.
  2. धन आणि लाभ भावांबाबत मात्र हे प्रमाण कमी दिसून आले. विशेषत: वडिलांच्या बाबतीत या भावांचे प्रमाण निव्वळ शक्यतेइतकेच होते. आयांच्या बाबतीत धन भावाचे प्रमाण पंचम भावाच्या खालोखाल दिसून आले. लाभस्थानाचे प्रमाण मात्र निव्वळ शक्यतेइतकेच दिसले. म्हणजेच, आयांच्या बाबतीत धन भावाचा आणि प्रथम संततिचा संबंध दिसला, पण वडिलांच्या बाबतीत तसा तो दिसला नाही, किंबहुना पंचमभाव सोडता तो तसा कुठल्याच भावासंबंधी दिसत नाही.
सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे पुस्तकातील सर्व नियम जसेच्या तसे लागू होताना दिसत नाहीत. पण लागू होणारे नियम या पद्धतीने वेगळे करता येतात. उदा. संततिसाठी पंचमभाव पहावा किंवा कुटुंबस्थानासाठी धनभाव पहावा, हे नियम पुस्तकांत मिळतात, परंतु "तसे का?" याचा विचार पुस्तकांत होताना दिसत नाही. या प्रयोगातून ते सांख्यिकीदृष्ट्या सिद्ध करणे शक्य आहे.

त्याबरोबरच ग्रहदशा, गोचर याबरोबरीने इतर कुठले घटक यावर परिणाम करतात का याचाही शोध या पद्धतीने घेता येइल. संगणकातील प्रगतीमुळे, खूप मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करणे शक्य आहे. आम्ही हाच प्रयोग मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्यासाठी सांख्यिकीच्या नियमांनुसार १००० पालक आणि त्यांच्या पहिल्या संततिच्या जन्मवेळा आणि जन्मस्थळे गोळा करत आहोत. याचा उपयोग आणखी सूक्ष्म आणि अचूक नियम मिळवण्यासाठी होइल.

आपण आपली माहिती देण्यास उत्सुक असाल तर ह्या Google Form चा वापर करा.

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

गणेशोत्सव आणि ज्योतिष

हिंदू धर्मातील सण हे ऋतू आणि ज्योतिषाचा विचार करून निश्चित केले आहेत. परंतु कालपरत्वे या सणांमागील विचार विसरून केवळ कर्मकांडाला आणि त्यातील मजेला प्राधान्य आले आहे. काहीवेळा ही कारणे पुराणातील गोष्टी/कहाण्या यांच्या रुपकांमध्येही हरवली आहेत. गणेश चतुर्थी हा ही एक असाच सण! या लेखात गणेशोत्सवामागील ज्योतिषात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे समाधानकारक उत्तरे आहेत आणि कुठे नवीन प्रश्न!

गणेशोत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून सुरु होतो तो त्या महिन्यातील शुक्ल चतुर्दशीपर्यंत चालतो. प्रत्येकच महिन्यातील चतुर्थीला गणपतीच्या नावाने व्रत/उपास करतातच. ह्या प्रथेची सुरुवात गणपती आणि चंद्राच्या कथेत आढळते. तुडुंब पोटभरून जेवून उंदरावरून निघालेल्या गणपतीची चाल पाहून चंद्र त्याला हसला. त्यामुळे गणपती रागावला आणि पुढील घटनांची परिणती चंद्राला कलांचा भोग मिळण्यात झाली, त्यातही चतुर्थीला चंद्रदर्शन करणार्यांवर खोटा आळ येईल असे सांगितले.  या गोष्टीला ज्योतिषातील काही बाबी जवळच्या वाटतात, त्या पुढीलप्रमाणे,
  1. मंगळ ह्या पहिल्या बाह्य ग्रहाची पृथ्वीसापेक्ष गती गमतीशीर आहे - हा ग्रह साधारणपणे दीड महिन्यात एक रास, म्हणजे क्रांतीवृत्तावरचे ३० अंश ओलांडतो. या वेळी त्याच्या भासमानभ्रमणाची दिशा चंद्रसूर्यांच्या भासमानभ्रमणाच्या दिशेप्रमाणे असते. परंतु साधारण दर दोन वर्षांनी ती दिशा विपरीत होते (ज्योतिषाच्या भाषेत मंगळ वक्री होतो). त्यावेळी त्याला एक रास ओलांडायला साधारण पाच महिने लागतात, म्हणजे गती साधारण तिपटीने कमी होते. हा एकच ग्रह असा अाहे की ज्याच्या वक्री आणि सरल गतीत एवढा फरक आहे. ज्योतिषानुसार गणपतीला मंगळाची देवता मानतात. त्याचे वाहन उंदीर. उंदराची सामान्य गती खूप जास्त असते पण तुडुंब पोट भरलेल्या गणपतीला वाहून नेताना मात्र ती एकदम कमी झाल्यास नवल कसले आणि ते पाहून सर्वात गतिवान असलेला ग्रह चंद्र हसला तर नवल ते काय? चंद्राच्या कला आणि मंगळाची मंद विपरीत गती यांचा संबंध असल्याचे सूचित होते पण सध्याच्या ज्योतिर्विज्ञानात हा संबंध सापडत नाही.
  2. चंद्र आणि शुक्र, बुध हे अंतर्ग्रह यांच्या कला दिसतात. मंगळ हा सूर्यापासून पहिला ग्रह अाहे ज्याच्या कला दिसत नाहीत. त्यामुळे मंगळाच्या, पर्यायाने गणपतीच्या शापाने त्या कला दिसतात म्हणण्यात कथालेखकाचा उत्तम कल्पनाविलास दिसतो.
  3. एक तिथी म्हणजे चंद्राचे सूर्यापासून १२ अंशांचे अंतर असते. प्रथमा ० ते १२ अंश, द्वितीया १२ ते २४ अंश, तृतीया २४ ते ३६ अंश, चतुर्थी ३६ ते ४८ अंश आणि पंचमी ४८ ते ६० अंश. यापैकी चतुर्थीला (खरेतर काही तृतीयेचा काळ आणि काही पंचमीचा काळ) चंद्रापासून सूर्य (म्हणजे चंद्राच्या प्रकाशाचा स्त्रोत) ३० अंशांपेक्षा जास्त मागे असतो, म्हणजेच ज्योतिषानुसार व्ययभावात असतो. व्ययभाव हा तुरुंग, आरोप, खोटे आळ, मानहानी यांचा कारक आहे. हेच चतुर्थीच्या चंद्राला पाहिल्यावर चोरीचा आळ येतो या समजुतीमागचे कारण असावे. ज्योतिषानुसार चोरीचा आळ यायला एवढेच पुरेसे नाही आणि दरवेळी चतुर्थीचा चंद्र पाहून चोरीचा आळ येत नाही हे आपण आपलेही अनुभवू शकतो.
गणपती आणि मंगळाचा संबंध अथर्वशीर्षातील पुढील श्लोकावरून कळेल,
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।
गणपती हा चार हातांपैकी दोन हातात शस्त्र, तिसऱ्या हातात असुराशी युद्ध करताना तुटलेला दात, लाल रंगाचा, लाल गोष्टी आवडणारा असा युद्धाचा देव आहे. मंगळ हा ज्योतिषानुसार युद्धाचा कारक आणि लाल ग्रह आहे. फक्त मंगळ हा काटक, बलवान असा दाखवला आहे तर गणपती स्थूल!

गणपती आणि मंगळाच्या या ज्योतिषातील संबंधामुळे, चतुर्थीचा मंगळाशी संबंध आला ती विशेष होते, उदा. चतुर्थी मंगळवारी आली की अंगारक योग होतो. भाद्रपद महिन्याची पौर्णिमा पूर्वाभाद्रपदा किंवा उत्तराभाद्रपदा या नक्षत्रांमध्ये असते (म्हणून महिन्याचे नाव भाद्रपद). पौर्णिमेच्या आधी साधारण ११ दिवस चतुर्थी असते. चंद्र साधारण एका दिवसात एक नक्षत्र ओलांडतो, ११ दिवसांत मागे ११ नक्षत्रे मागे गेल्यास ल्यास, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवसभरात कधीतरी चंद्र चित्रा या मंगळाच्या नक्षत्रात असतो. दिवसापेक्षा नक्षत्र अधिक फलदायी त्यामुळे हा मुहूर्त गणपतीपूजेसाठी अंगारक योगापेक्षा जास्त फलदायी (अर्थात इतर ग्रहस्थितीनुसार फरक पडतोच).  म्हणून या मुहूर्तावर गणेशाची एकापेक्षा जास्त दिवस उपासना करायचे व्रत सुरु होते.

असेच चतुर्थीला मंगळाचे नक्षत्र वैशाख (मृग नक्षत्र) अाणि पौष महिन्यात (धनिष्ठा) येते, पण त्या वेळी काही विशेष व्रत होत नाही. यामागे कदाचित तेव्हाचे ऋतू कारणीभूत असतील किंवा चित्रा नक्षत्रात काहीतरी विशेष असेल, ज्याची हे व्रत या महिन्यात योजणाऱ्यांना माहिती होती आणि आता ती विस्मृतीत गेली आहे.

त्याचबरोबर चतुर्थीचा आणि गणपतीचा संबंध काय किंवा चतुर्थी गणपतीला का प्रिय याचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही. एका त्रोटक संदर्भाप्रमाणे ज्याप्रमाणे ग्रहांना देवता दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे तिथींनाही देवता आहेत आणि चतुर्थीची देवता गणपती आहे. ग्रहांचा देवतांशी संबंध लावताना, ग्रह आणि देवता यांच्या गुणधर्मातील साम्य वरीलप्रमाणे लक्षात घेतले आहे. परंतु तिथी ही चंद्रसूर्यातील अंशात्मक अंतरावरून ठरते, ज्यावरून ग्रहयोग ठरवतात. ग्रहयोगांचे गुणधर्म त्या त्या ग्रहांवर अवलंबून असतात. चंद्रसूर्यातील अर्धकेंद्रयोग (४५ अंशाचा योग, जो चतुर्थीला होतो) अाणि गणपती यांत कुठले साधर्म्य आहे याचे विश्लेषण मला सापडले नाही.

गणेशोत्सवामागचे किंवा गणेशोत्सवदर्शित ज्योतिष शोधण्याचा माझा हा अल्प प्रयत्न. यातील बरीच माहिती वेगवेगळी विखुरलेली मिळाली ती इथे एकत्र केली आहे. याबद्दल अधिक माहितीचे, मतांचे स्वागत आहे.

संदर्भ:
१. दाते पंचांग, कृष्णमूर्ती पंचांग
२. कुंडली तंत्र आणि मंत्र - भाग १, व. दा. भट


शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

डॉ. दाभोळकरांचे मारेकरी सापडतील का?

मागील लेखांमध्ये आपण वस्तू कशा शोधायच्या हे पाहिले. तेच नियम व्यक्ती शोधण्यासही लागू होतात, फक्त त्या लेखात म्हटल्याप्रमाणे राशी आणि ग्रहांचे कारकत्व व्यक्तीनुसार योजावे लागते. उदाहरणार्थ, प्रश्नकुंडलीत चंद्र जर वृश्चिक राशीत असेल तर दरी किंवा निदान माणूस मावू शकेल इतकी मोठी घळ असली पाहिजे, चंद्राबरोबर बुध असेल तर हरवलेल्या व्यक्तीबरोबर एखादे लहान मूल किंवा प्रश्नकर्त्याच्या अाजोळची व्यक्ती असण्याची शक्यता असू शकते. व्यक्तीच्या बाबतीत वृश्चिकेसाठी छोटी सापट अाणि बुधासाठी पुस्तक योजणे बरोबर नाही.

एक वर्षापूर्वी डॉ. दाभोळकरांच्या हत्येने पुण्यात मोठी खळबळ उडवली होती. तेव्हा माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने मला मारेकरी मिळतील का, कुठे मिळतील? असा प्रश्न केला काळजीतून केला होता. या व्यक्तीचा दाभोळकरांशी, त्यांच्या कार्याशी अथवा पोलिसांशी काहीही संबंध नव्हता अाणि अाजही नाही. सकृतदर्शनी केवळ विचार पटले नाहीत किंवा विचारांच्या पातळीवर विरोध होता, म्हणून कोणाची हत्या, तीही पुण्यात होईल हे धक्कादायक होते. सामान्य लोकांना अापल्या जिवाची काळजी न वाटती तर नवलच. निदान असे प्रकार पुढे न होण्यासाठी तरी मारेकरी सापडावेत, हत्येचा हेतू कळावा असे वाटले तर नवल नाही.

या प्रश्नाची भावचलित कुंडली पुढीलप्रमाणे,

प्रश्नकुंडली: १ सप्टेंबर २०१३, १८:०९, पुणे
चंद्र नवमस्थानी कर्क राशीत, पुनर्वसू नक्षत्रात, कर्क नवमांशात चंद्राच्या उपनक्षत्रात अाहे. तिथे त्याबरोबर मंगळ अाणि गुरु अाहेत. चंद्राचा भाव, रास अाणि त्याच्याशी संबंधित ग्रह यातून मारेकऱ्याचे प्रश्न विचारण्याच्या वेळचे स्थान अाणि तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्ती यांच्याबद्दलचे निष्कर्ष धक्कादायक असल्याने तो कुठे अाहे हे सांगणे मी टाळले. इथेही मी ते लिहित नाही. सूज्ञ वाचक संदर्भपृष्ठांचा वापर करून ते ओळखतीलच! पण ते पाहिल्यावर मी हे मारेकरी मिळणार नाहीत, असे सांगितले. अाज वर्ष होत अाले तरीही ते मिळालेले नाहीत हे सर्वज्ञात आहे.

डॉक्टरांनी केलेलं कार्य खूप मोठं आणि आजच्या काळात गरजेचंही (अगदी ह्या ब्लॉगच्या विषयाला सकृतीदर्शनी विरोधी असलं तरीही). ह्या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला नम्र श्रद्धांजली!

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

Lost and found: the astrology way

Easiest and most useful application of astrology is finding the lost objects. It's worth studying basic astrology, at least to find our own lost objects. This article explains the same with examples.

Method

There are quite a few methods of finding lost objects in various systems of astrology. I am explaining a method which is very simple and yet very effective.

Astrologer is to cast the horoscope at a time when he is posed a query about lost object using the place where the astrologer is (rather than where the object was lost or where the querier is). The Moon's position in this horoscope gives clues as to where the object is. The Moon's position is to be used as per the following rules -
  1. Signification of the Moon - Since this is a horary chart, the Moon should be significator of the house which indicates the lost object. For example, second house if jewelry is lost, third house for lost documents etc. Usually the Moon himself is in house signifying the lost of object or Karka rules that house. If the Moon is not significator of relevant house, the horoscope can not be used for answering the question.
  2. Moon's house - House where the Moon is indicates the place where the object is. For example, a Moon in fifth house indicates the children or the play house or a Moon in the twelfth house indicates the bedroom and so on. A chart here lists the places indicated by various houses.
  3. Moon's sign (Nirayana) - Like Moon's house, its sign also indicates a place. Hence one has to combine both the indication to infer the right place. The sign also indicates the color of the enclosure if the object is hidden inside an envelop, bag, trunk or a room. The chart here lists the places and colors indicated by Nirayana signs. For example, for a Moon in Meena and twelfth house, both house and sign indicate the bedroom. In such a case, the object can be found in the bedroom near a water container or near fish-tank or inside a green bag.
  4. Moon's star (Nakshatra) - Like the sign, Moon's star indicates the color of the enclosure. It also indicates person/s possessing the object or in some way related to the loss. The person or color should be inferred according to the properties of the lord of star.
  5. Moon's navamamsha - This can be used to further clarify the place indicated by the house and the sign. It's signification is same as the signs.
  6. The planets aspecting the Moon - The planets forming aspects with the Moon indicate the objects nearby the lost object. Such objects should inferred according to the signification and colors of planets as found in the chart here.
These six indications should be combined to predict the place where the lost object can be found. One has to apply common sense while coming to a final answer. For example, if the Moon is in Vrishchika the size of the gap or the trench should be decided based on the size of the lost object. The table below contains some examples.

    Some statistics

    I have total of 24 horoscopes for lost objects. Out of those, in 13 cases the objects were found and amongst those in 12 cases, they were found at the places indicated by the Moon's position.

    We have not tackled the question of whether we will be able to find the object or not here. That's topic of some other article.

    Examples


    Time and place of query Moon's position Moon's aspects The place where object was found
    House Sign Star Navamamsha
    27/Jun/2012 21:29:00, Pune 8 Kannya Hasta Mithun Mars, Saturn In a chest full of books (Mithun) near the floor (Kannya), in a gap (8th house) between a black (Saturn) and a Red (Mars) object.
    22/Mar/2012 19:32:00, Pune 6 Meena U. Bhaa Kannya Sun, Mercury In the bedroom (Meena), near the floor (Kannya), with other documents (Mercury) containing some documents from government (Sun).
    14/Apr/2014 10:14:00, Pune 4 Kannya Hasta Mithun Mars, Jupiter In a cupboard near a box containing medicines (Kannya), in a white bag (Hasta), near another red object (Mars), in almost vacant compartment (Mithun), in a room containing religious books (Jupiter)
    3/Jul/2013 19:44:00, Pune 12 Mesha Ashwini Mithun Saturn, Mercury, Sun, Ketu In bedroom (12th house), near the ceiling in a red box (Mesha), with a black (Saturn), an Orange (Ketu) object, and medicines (Sun and Mercury)